पूर्वीच्या काळापेक्षा विज्ञान तंत्रज्ञानाने मानव जास्त सामर्थ्यशाली झाला आहे.मानवाचा शेतकरी,पर्यटक, उद्योजक म्हणून जिथे जिथे पाय पडतोय तिथले विविध प्राणी,पशुपक्षी,कीटक, वनस्पती यांचा निर्वंश होत चाललाय. पुराप्राणीशास्त्रज्ञांच्या (paleontologists) अभ्यासानुसार प्रत्येक ठिकाणी मानवाचं आगमन आणि तिथल्या प्राण्यांचा निर्वंश या दोन्ही गोष्टी अगदी एकाच वेळी घडल्यात. निसर्ग टिकला तरच माणूस जगेल नाहीतर आपलाही निर्वंश व्हायला वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment